शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘राजाराम’ बंधाºयाजवळ पाणी प्रदूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 00:35 IST

कसबा बावडा : येथील राजाराम बंधाºयाजवळ पाणी प्रचंड प्रदूषित झाले आहे. या पाण्यावर मोठ्या प्रमाणात तेलकट तवंग पसरला आहे. तसेच नदीतून वाहून आलेला प्लास्टिकचा कचरा, निर्माल्य बंधाºयाजवळ तुंबल्याने व पाण्याचा रंग हिरवट-काळसर झाल्याने पाण्याला उग्र वास येत आहे. बंधाºयातून खालील बाजूस मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याशिवाय पाण्याचे प्रदूषण कमी होणार नाही ...

कसबा बावडा : येथील राजाराम बंधाºयाजवळ पाणी प्रचंड प्रदूषित झाले आहे. या पाण्यावर मोठ्या प्रमाणात तेलकट तवंग पसरला आहे. तसेच नदीतून वाहून आलेला प्लास्टिकचा कचरा, निर्माल्य बंधाºयाजवळ तुंबल्याने व पाण्याचा रंग हिरवट-काळसर झाल्याने पाण्याला उग्र वास येत आहे. बंधाºयातून खालील बाजूस मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याशिवाय पाण्याचे प्रदूषण कमी होणार नाही अशी स्थिती आहे. सध्या बंधाºयाजवळ १४ फूट इतकी पाण्याची पातळी आहे.राजाराम बंधाºयाला एकूण ५९ मोहरी आहेत. त्यापैकी काही मोजक्याच मोहरींतून पाणी खालील बाजूस सोडले आहे. उर्वरित सर्व मोहरी बंद आहेत. त्यामुळे बंधाºयाजवळील पाणी प्रवाहित न झाल्याने दूषित झाले आहे. या पाण्यात पंचगंगा नदीतून तसेच जयंती नाल्यातून आलेला कचरा सध्या बंधारा अडविल्यामुळे अडकून पडला आहे. याशिवाय जयंती नाल्यातून व बावड्यातील दोन-तीन नाल्यांतून वाहून आलेले दूषित पाणी बंधाºयाजवळ तटल्याने बंधाºयाजवळील पाणी हिरवे-काळे झाले आहे. पाण्याला उग्र वास येत आहे.या दूषित पाण्याच्या उग्र वासाने बंधाºयावरू ये-जा करणाºया वाहनधारकांना नाकाला काहीवेळा रुमाल लावावा लागतो. येथे पोहण्यासाठी दररोज येणाºया तरुणांची संख्याही दूषित पाण्यामुळे रोडावली आहे. या दूषित पाण्यात आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने आता हळूहळू मासे मृत होण्यास सुरुवात झाली आहे.राधानगरी धरणातून पाणी सोडल्यास....सध्या राजाराम बंधाºयाजवळ १४ फूट इतकी पाण्याची पातळी आहे. त्यामुळे बंधाºयातून योग्य त्या प्रमाणात खालील बाजूस पाणी सोडल्यास दूषित पाण्याचे प्रमाण कमी होईल. तसेच ही पातळी भरून येण्यासाठी राधानगरी धरणातून पाणी सोडल्यास शिंगणापूर उपसा केंद्राची पाणी पातळीही स्थिर राहील.नेजदार फौंडेशनच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविणारयेथील डॉ. संदीप नेजदार फौंडेशनच्यावतीने तसेच बावड्यातील काही तरुण मंडळांची मदत घेऊन राजाराम बंधारा परिसर तसेच बंधाºयात अडकलेला कचरा, निर्माल्य यांची स्वच्छता केली जाईल, असे डॉ. संदीप नेजदार फौंडेशनचे अध्यक्ष व स्थायी समिती सभापती डॉ. संदीप नेजदार यांनी सांगितले.शेतात पिण्यासाठी घरचे पाणीराजाराम बंधाºयापासून ते एमआयडीसी पुलापर्यंत शेतात काम करणारे शेतकरी, शेतमजूर पूर्वी नदीचे पाणी पीत असत, परंतु आता शेतकरी, शेतमजूर कधीही नदीचे पाणी शेतात काम करत असताना पीत नाहीत. त्यासाठी घरातून पाणी नेले जाते. इतकी दूषित पाण्याची भीती आता लोकांना वाटत आहे.